Знакомьтесь сообщенийИзучите увлекательный контент и разнообразные точки зрения на нашей странице «Обнаружение». Находите свежие идеи и участвуйте в содержательных беседах
मुंबई-गोवा महामार्ग रस्त्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. पण 2019 मध्ये जेव्हा नितेश राणे साहेबांनी अधिकाऱ्याला चिखलाने आंघोळ घातली होती तेव्हा शिवसेनेचे लोक नितेश राणेंना गुंडगिरी संबोधून कारवाईची मागणी करत होते, नितेश राणेंना 8 दिवस तुरुंगवास झाला.. रत्नागिरी-रायगड ची जनता ह्याच शिवसेना नेत्यांना पाठिंबा देत होती.. चिपळूनचा वाळूचोर भास्कर जाधव हायवे ठेकेदारांच्या पैशावर मुलाचे थाटामाटात लग्न करत होता पण त्याला जनता दिसत नव्हती.. काही ठाकरे सेनेच्या लोकांनी लोकांना भडकावून काम बंद पाडून ठेकेदाराकडून इंनोव्हा फॉर्च्युनर घेतल्या, नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली पण फरक पडला नाही..
परिणामी रायगड रत्नागिरीत काम रखडले तर सिंधुदुर्गच्या जिल्ह्यात संपूर्ण रोड काँक्रीटीकरण 4 लेन झाला , राणे कुटुंबाची विकासकाम करण्याची पध्दत हीच आहे जे नितेश साहेबांनी 4 वर्ष पूर्वी ओळखलं ते बाकीच्या पक्षातील लोकांना आता सुचू लागलं आहे, शेवटी जनतेने ठरवायचं असत खरा विकास कोण करु शकत आणि भावनिक खोट राजकारण कोण करत ते